सादर नमस्कार !!
मला, इन्सुलिन घेणे आवश्यक
असलेला मधुमेह आहे आणि तरी मी ते घेतले नाही तर काय होईल? मुलगा जर
वडिलांना म्हणाला, मी आज शाळेत गेलो नाही तर काय होईल? वडील बायकोला
म्हणाले, मी आज ऑफिस ला गेलो नाही तर काय होईल?मी आयकर भरला नाही तर काय
होइल?
असे अनेक प्रश्न आहेत आणि वरकरणी विचार केला तर त्याची
उत्तरं म्हणजे -- "काहीही होणार नाही". पण हे बरोबर उत्तर नाहि. एक दिवस
शाळेत गेले नाही तर काही होत नाही पण शाळेत न जाण्याची सवय झाली तर चालेल
का? नाही चालणार.
अगदी याच भूमिकेतून -- मी शास्त्राभ्यास केला
नाही, करणार नाही असे जर तरुण वयात (म्हणजे ३०-३५ वयानंतर) म्हटले तर चालेल
का? वरवर विचार करता काही फरक पडणार नाही. पण आयुष्यभराचा विचार करता फार
मोठे नुकसान होईल.
मला वाटते मुद्दा पटवून देण्यासाठी एवढे विवेचन पुरे. एवढ्या या छोट्या प्रस्तावाने नंतर माझा आता आपणास प्रामाणिक आग्रह:
सोबतचा
दीपावली युक्ताहार घ्या. म्हणजेच कैवाल्योपानिषदावरील लेख वाचा. अवघड
वाटेल, माझ्यासाठी तो नाही असे वाटेल, समजणार नाही असे वाटेल तरीही वाचा.
सवडीने वाचा. तुम्हाला निश्चित पटेल. वाचून झाल्यावर, माझ्या geetafoundation@gmail.c om वर प्रतिसाद द्या. तुमच्या आप्त-मित्र-परिचितांना हा लेख फॉरवर्ड करा.
धन्यवाद. श्रीकृष्ण शरणं मम!
आपला सहृदय